राज्यसभेचे सदस्य-भाजपचे प्रमुख कार्यवाह अरुणसिंग यांचे मतदारांना आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
देशाच्या विकासात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कित्येक दशकानंतर देशामध्ये विकासाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणे आवश्यक ठरते, असे विचार राज्यसभेचे सदस्य व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यवाह अरुणसिंग यांनी क्यक्त केले.
लिंगराज कॉलेजच्या आवारात आयोजित सभेमध्ये केएलई संस्थेचे कर्मचारी आणि अन्य पदाधिकारी यांच्या सभेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर कोरे होते. अरुणसिंग म्हणाले, गेल्या कोणत्याही सरकारने मोदी इतके कार्य करून दाखविले नाही. भारतीय जनता पक्ष आपल्या सिद्धांताशी कटिबद्ध असून मोदींनी सामान्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. पक्षाने नेहमीच समर्थ व्यक्तींना संधी दिली आहे. पक्षामध्ये अनेकांनी नि÷sने सेवा केली आहे. दिवंगत सुरेश अंगडी त्यापैकीच एक होत. त्यामुळे मतदारांनी मंगला अंगडी यांना विजयी करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते.
यावेळी पक्षाचे आणखी एक प्रधान कार्यवाह सी. टी. रवी यांनी प्रथमताच देश तत्त्वनि÷sवर चालला आहे. आम्हाला देशाची प्रगती महत्त्वाची आहे. आम्ही लोककल्याणासाठी कार्य करणारे कार्यकर्ते आहोत, असे सांगितले.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी आमच्या जिल्ह्य़ात प्रथमच एक महिला लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभी आहे. मतदारांच्या एकएक मताने जिल्हय़ात नवा इतिहास घडणार आहे. त्यामुळे मंगला अंगडी यांना निवडून देणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. डॉ. महेश गुरगौडर व प्रा. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.