मुंबई \ ऑनलाईन टीम
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु असलेली प्रतिवीधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विधानसभेत काळा अध्याय लिहिला गेला आहे. खोटे आरोप लावून आमच्या १२ आमदारांचं निलंबन केलं गेलं. शांतपणे प्रति अधिवेशन सुरू होते, पण मार्शल पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही केली. आमचं अधिवेशन चालणार पण पत्रकारांना हाकलत असतील तर प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार. लोकशाहीच्या दोन्ही सभांना कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करतं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी कितीही दहशत केली आमचा आवाज बंद होऊ शकत नाही, बंद केला जाऊ शकत आम्ही या ठिकाणी सरकारचा विरोध करणार, विरोधात बोलणार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या सदरा फाडणार त्यामुळे माध्यमांनी सहकार्य करावे, अध्यक्षांचा आदेश आहे सांगून माध्यमांना धक्काबुक्की केली आहे. ही एक प्रकारची आणीबाणी लावली आहे. आम्हाला बंदी केली तरी आम्ही प्रतिविधानसभा भरवणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
सगळ्यांचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतुल काल खोटं आरोप करुन सदस्यांना निलंबन केलं आहे. शांतपणे आमचे प्रतिअधिवेशन सुरु होते. परंतु मार्शलांनी येऊन अधिवेशन बंद करुन माध्यमांवर दंडूकाशाही सुरु आहे. माध्यमांना त्रास देत असेल तर पत्रकार कक्षात आम्ही भाषण करु, आम्ही शांतपणे पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करणार आहेत. आम्ही लवकरच आयोजन करुन पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करु, असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.