ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी पाटण्यात आलेल्या लालूप्रसाद यादव यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. भाजपमुळे देश गृहयुद्धाकडे वाटचाल करत असून याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी भाजपाची तुलना इंग्रजांशी केली आहे. ते म्हणाले की, ७० वर्षांनंतर भारतात पुन्हा नवे इंग्रज आले आहेत. प्रकृती ठीक नसल्याने आपण उत्तर प्रदेशात प्रचाराला जाणार नसल्याचंही लालू प्रसाद यांनी सांगितलं.