ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपावर हल्लाबोल केला. ते दृकश्राव्य माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडली या वक्तव्याचाही पुनरुच्चार केला. त्यांच्या या मताशी सहमत असल्याचं आज नवाब मलिक यांनी सांगितलं. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
ते म्हणाले, “ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, भाजपासोबत युतीत असताना शिवसेनेची २५ वर्षे सडली. हे खरं आहे. देशात भाजपाने ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं ह्यामुळेच अनेक दिवसांपासून ते काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते आणि २०१९ सालचे निवडणुकांचे निकाल पाहून त्यांनी निर्णय घेतला. मला वाटतं आता शिवसेनेचा विस्तार होईल”.