प्रतिनिधी / जयसिंगपूर
मोदी सरकारने सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सुत्रानुसार शेतकर्याला दिडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच मुक्त करण्याचा कायदा केला आहे. अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हरियाणा राजस्थान बॉर्डरच्या शेतकरी आंदोलनात केले.
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज सतरावा दिवस असून, आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. या आंदोलनावरुन केंद्रातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे. सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतकरी देशभरात रेल्वे आणि दिल्लीला जाणारे सर्व महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना स्वतंत्र देण्याच्या नावाखाली कार्पोरेट जगताच्या दावणीला भारताची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था बांधण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. आणि त्यामुळेच कोणत्याही चर्चेविना सरकारने हे कायदे सभागृहात मंजूर केले आणि शेतकऱ्यांच्या माथी मारले आहेत. याला विरोध करण्यासाठी पंजाब हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करण्यात येत आहे. आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. या आंदोलक शेतकरी दिल्लीकडे जाऊ नये म्हणून रस्त्यावरती खड्डे करण्यात आले आहेत. तरीही आंदोलक शेतकरी जोराने निकराचा लढा देत आहेत. जणूकाही आंदोलक शेतकरी दुसऱ्या देशातून भारतामध्ये घुसखोरी करत असल्यासारखं वागणूक त्यांना मिळत आहे.
जर मोदी सरकारच्या बेधुंद शाहीला आपण आळा घालायला अपयशी झालो तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आज राजस्थान मधून आलेल्या शेतकर्यांनी शहॉंजानगाव येथे अडविल्याने जयपूर दिल्ली महामार्ग बंद झाल्याने दिल्लीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. या आंदोलनात यावेळी योगेंद्र यादव , मेधाताई पाटकर, मा. खा. हानन मौला, अशोक ढवळे , प्रतिभा शिंदे , कविता कनगुटी, कॉम्रेड सत्यवान आदि. उपस्थित होते.