प्रतिनिधी /मडगाव
भारतीय जनता पक्षाला सत्तेवरुन हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच त्यांनी एकत्र येऊन ‘टीम गोवा’ तयार होण्याची गरज आहे. असे घडले तरच आपण भाजपला 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवू शकतो असे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. काल बुधवारी फातोर्डा येथे शेतात रोप लावण्याच्या कार्यक्रमावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काँग्रेस हा जुना पक्ष असून ते कोणताही निर्णय घ्यायला ते उशीर लावतात. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच त्यांच्याशी युतीचा प्रस्ताव मांडला होता. जर काँग्रेसने युती केली नाही तर काही हरकत नाहे. मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाने युती केली होती. तरी सुद्धा फातोडर्य़ात काँग्रेस पक्षाने काही प्रभागात उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला. गोवा फॉरवर्डच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आले. तेव्हा त्या उमेदवारांना तीनचा आकडा देखील पार करता आला नव्हता.
राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडून गेलेली आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱया प्रत्येक नागरिकाचा आ<वाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
फातोर्डा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱयाने शेती करावी. एकाही शेतकऱयांने आपली शेती पडिक ठेऊ नये. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे विजय सरदेसाई म्हणाले. राज्यातील कोळसा त्वरित बंद करावा. कारण याचा फायदा जनतेला नसून बडे उद्योजक जिंदाल, अदानी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री मिलिंद नाईक यांना होत आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत हे बेकयादेशीररित्या खाण सुरु करण्याचे प्रयत्न करत होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळल्याने याचा फटका प्रमोद सरकारला बसलेला आहे असे, आमदार सरदेसाई म्हणाले.