मुंबई/प्रतिनिधी
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हिरेन मनसुख हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमबीर सिंग यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पण एनआयएने मात्र सचिन वाझे अँटिलिया प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोटी माहिती देत होता. मनसुख हिरेनच्या हत्येनंतरही ती आत्महत्याच आहे असं वाझे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होता, असा दावा एनआयएने आपल्या अहवालात केला आहे.
दरम्यान, एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अहवालात बदल करण्यास सांगितले होते, असा दावा अँटिलिया बॉम्ब प्रकरणी मुंबई पोलिसांसोबत काम केलेल्या एका सायबर तज्ज्ञाने केला आहे. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी परमबीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंह यांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे चार्जशीटमध्ये परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप मलिक यांनी बुधवारी माध्यमांसमोर बोलताना केला होता.
गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मलिक यांनी, NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमबीर सिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.