प्रतिनिधी / शाहुवाडी
कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री दहा आमदार आणि दोन खासदार जरी विरोधात असले तरी देखील भाजप मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार हेच पदवीधर निवडणुकीत मताधिक्य घेणार असा आत्मविश्वास खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी मलकापूर येथे आयोजित दौरा प्रसंगी केले.
पदवीधर शिक्षक मतदार निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला त्याप्रसंगी मलकापूर येथे आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, अजितसिंह काटकर ,शामराव कारंडे, तालुकाध्यक्ष विजय रेडेकर ,ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर लाड, पंडित तडवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की भाजप सर्वच ठिकाणी पूर्ण ताकदीने लढत देत आहे. महा विकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत कुरघोडी तच व्यस्त आहे. केवळ विरोधकांवर टीका करणे हेच काम हाती घेतले असून सरकार पूर्णता अपयशी पडले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती कोटीची विकास कामे केले युवकांसाठी काय केले याचा लेखाजोखा सत्ताधारी मंडळींनी मांडावा जिल्ह्याच्या विकासात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांचा मोलाचा वाटा आहे. या सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला मात्र यात काय धोरणात्मक निर्णय घेतले गोर गरीब जनतेसह सर्वसामान्य जनतेसाठी काय विकास साधला मी संघर्षातून पुढे आलेलो आहे या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी भाजप मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विजयी होणार यात तिळमात्रही शंका नाही.
या दौऱ्याप्रसंगी नगरसेवक भारत गांधी, अशोक देशमाने, शाहू साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री घोरपडे ए बी पाटील, दाजी चौगुले ,महिपती पाटील ,बाळासाहेब पाटील ,संजय खोत, सुनील वाणी ,उदय देसाई, भीमराव पाटील, आदींच्या सह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मधुकर लाड यांनी आभार मानले.