ऑनलाईन टीम / मुंबई :
कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भातखळकर यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे. यावेळी भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारची मोगलाई…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं.
कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी… हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ठाकरे सरकारची मोगलाई… शुक्रवारी रात्री 12 वाजता नोटिसा देऊन आज सकाळी 9 च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढले. यावेळी आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी… हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.
मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले त्या प्रकल्पातील एक स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही? @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @JaiMaharashtraN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?, असा सवाल देखील भातखळकर यांनी केला आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा… पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, आम्ही आंदोलन करणारच आहे. उच्च न्यायालयाने कोविड काळात घरं तोडण्यास मनाई केलेली आहे, असं असतानाही पोलिसांनी बळजबरी करत कारवाई केली. याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.