करहल मतदारसंघातील उमेदवार : ताफ्यावर झाला होता हल्ला
केंद्रीय मंत्री आणि मैनपुरी जिल्हय़ातील करहल मतदारसंघाचे भाजप उमेदवार एसपी बघेल यांना झेड शेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान बघेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सीआयसीएफचे जवान बघेल यांना सुरक्षा पुरविणार आहेत.
11 फेब्रुवारीपासून केंद्र सरकारकडून सशस्त्र दलाची सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांना झेड शेणीची सुरक्षा उपलब्ध करविण्यात आली आहे. तर बघेल यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी पोलीस करत आहेत.
बघेल यांच्या ताफ्यावर मंगळवारी संध्याकाळी हल्ला झाला होता. लाठय़ाकाठय़ांनी बघेल यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. पैरा शाहपूरमध्ये प्रचार केल्यावर परतताना हा हल्ला झाला होता. अतिकुल्लापूर गावानजीक काही लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. शेकडो लोकांनी आपल्या वाहनावर हल्ला केल्याचा दावा बघेल यांनी केला होता. बघेल यांनी याची माहिती मैनपुरीच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून दिली होती. परंतु पोलीस पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर पसार झाले होते.
अखिलेश यांच्यावर आरोप
अखिलेश यादव यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. अखिलेश यादव देखील करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अखिलेश यांनी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने हा हल्ला घडवून आणल्याच आरोप उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे. अखिलेश यादव पराभवाच्या उंबरठय़ावर असल्यानेच हा हल्ला करविण्यात आल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केला.