मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे आवाहन : पणजीत बूथ चलो अभियान-विस्तारक कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांमध्ये गोव्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे . त्यापूर्वीच्या एकाही सरकारने भाजप सरकार इतके विकास प्रकल्प उभे केले नव्हते. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेही देशाचा भरपूर विकास केलेला आहे. या दोन्ही सरकारच्या विकास कामाच्या बळावर येती निवडणूक भाजप कार्यकर्त्यांनी जिंकायची असून सध्या भाजपकडे 27 आमदार आहेत. त्यामध्ये आणखी वाढ कशी होईल यासाठी सक्रियपणे प्रत्येकाने पुढील दोन महिने काम करावे . असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केले .
पणजी येथे आयोजित बूथ चलो अभियान- विस्तारक कार्यक्रमा अंतर्गत घेतलेल्या राज्यभरातील भाजपाच्या मंडळ अध्यक्षासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर , सरचिटणीस दामू नाईक, सरचिटणीस एडवोकेट नरेंद्र सावईकर, तसेच संघटन मंत्री सतीश धोंड आणि सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भाजपाने नेहमीच लोकांच्या हिताचा विचार केलेला आहे. भाजपचे कार्यकर्ते अनुभवी आहेत. त्यांनी लोकापर्यंत जाऊन गोवा सरकारच्या विविध विकास कामांची माहिती लोकांना द्यायला हवी . मग ते कोरोना नियंत्रणाचे काम असो किंवा स्वयंपूर्ण गोवा काम असो. अनेक योजना असोत किंवा विविध प्रकल्प असोत. याची माहिती सगळय़ा मतदारांना मिळाली तरच मतदार भाजपला पुन्हा एकदा निवडून देणार आहेत. गेली दहा वर्षे भाजपाच्या सत्याची, सातत्याची व विकासाची राहिली असून पुढील पाच वर्षे ही भाजपाची असणार आहेत. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले . केंद्र सरकारने कधी नव्हे ते तीस हजार कोटी रुपये गोव्याला विकास प्रकल्पासाठी दिले असून जे विकास प्रकल्प उदाहरणात मोपा विमानतळ, जुवारी पूल पूर्ण करून त्यांचे उद्घाटन करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाचे सरकार गोव्यामध्ये येण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .
जोपर्यंत मतदारांना भाजपाचे काम माहित होत नाही तोपर्यंत मतदार आकर्षित होणार नाही. त्यासाठी भाजप सरकारने शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात , सामाजिक क्षेत्राबरोबरच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरीची माहिती कार्यकर्त्यानी मतदारांच्या मनामध्ये बिंबवणे गरजेचे आहे . पुन्हा आपल्याला भाजपाचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. हाच ध्यास घेऊन कार्यकर्त्यानी काम करायला हवे. गोव्यामध्ये भाजपाला हरवणे अशक्मय असल्यामुळे विरोधक आता युतीचा प्रयत्न करत आहेत . मात्र त्याकडे दुर्लक्ष करून विकासकामाच्या आधारे पुन्हा भाजपचे बहुमताचे सरकार येईल यासाठी सर्वांनी एकसंघपणे सक्रिय काम करावे असे आवाहन पुढे बोलताना डॉक्टर सावंत यांनी केले. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी यावेळी बोलताना सांगितले की भाजप हा एकमेव कार्यकर्त्यांचा पक्ष आहे . इतर पक्ष हे कुटुंबाचे पक्ष आहेत. भाजपा मध्येच कार्यकर्ता बडा नेता बनू शकतो . इतर पक्षांमध्ये ते अशक्मय असल्याचे सांगून भाजप साठी काम करणे देश सेवेचे काम असल्याचे डॉक्टर कराड म्हणाले . आपल्याकडे अनेक चांगले चांगले नेते आहेत. आपली निती व नियत ही चांगली आहे .त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाचे सरकार घडविण्यासाठी आणि त्याद्वारे राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉक्टर कराड यांनी केले.
गोव्यात भाजपला पुन्हा सत्ता मिळावी हे फक्त कार्यकर्त्यांच्या मनात असून चालणार नाही तर ते प्रत्येक मतदाराच्या मनात असायला हवे. आणि त्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांनी मतदारांशी सलग्न होणे गरजेचे असल्याचे सदानंद शेट तानावडे म्हणाले. यावेळची निवडणूक ही वेगळी असेल .त्यासाठी
भाजपाच्या योजना लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे बॅनर लावून मते मिळत नाहीत. तर तळागाळातील कामामुळे मिळतात . हे दाखवून देण्याची आता वेळ आली असून पुढील दोन महिने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करून भाजपला बहुमत देण्यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे . 20 टक्के मतदार हे अस्थिर असतात आणि त्याच मतदारांना भाजपाकडे वळवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ओबीसीचे हित फक्त भाजपाने जपलेले असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा एकमेव भाजप पक्ष असल्याचेही त्याने तानावडे यांनी पुढे बोलताना सांगितले. पक्ष ज्याला उमेदवारी देईल तो उमेदवार आपला. हे लक्षात ठेवून फक्त कमळ हे चिन्ह ध्यानी ठेवून प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे असेही तानावडे म्हणाले. संघटन मंत्री सतीश धोंड यांनी एकूणच विस्तारक योजना आणि बूथ चलो अभियानाची माहिती दिली .
विस्तारकांनी 21 ते 30 नोव्हेंबर या काळामध्ये प्रत्येक बुथवर जाण्याची गरज असून नेमून दिलेल्या मतदारांशी त्या त्या बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मतदारांपर्यंत पोहोचायला हवे. त्यापूर्वी बैठक घेऊन नियोजन करण्याची सूचना यावेळी धोंड यांनी केली. पुढील दोन महिने परिश्रम घ्यायचे असून सलग दहा दिवस काम करा आणि बहुमत प्राप्त करा .असा संदेश यावेळी धोंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला .
राजकारण हे तत्त्वासाठी लोकहितासाठी आणि देशासाठी भाजपने केले आहे. स्वतःचे हित बाजूला ठेवून वावरणारे कार्यकर्ते हेच भाजपचे देवदुर्लभ कार्यकर्ते आहेत. आणि ते दाखवून देण्याची संधी या निवडणुकीत पुन्हा एकदा आल्याचे धोंड म्हणाले .
याप्रसंगी बोलताना भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रुपेश कामत यांनी सोशल मीडियावर प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची सूचना केली. फेसबुक , व्हाट्सअप , ट्विटर या माध्यमातून भाजपाचे काम लोकांपर्यंत पोचवा. भाजपाचा प्रचार सक्रियपणे करा. कारण सोशल मीडिया आता प्रभावशाली ठरलेली आहे असेही कामत म्हणाले . तर सरचिटणीस दामू नाईक यांनी
वैयक्तिक कामे झालेले नाहीत म्हणून नाराज न होता गोव्याच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी तडजोड करावी आणि भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी सक्रीय व्हावे. असे आवाहन केले. गोव्याचा आणि देशाचा विकास भाजपाने केला आहे. हे मतदारांना पटवून देण्याची आता वेळ आली असल्याचेही ते म्हणाले .
नरेंद्र सावईकर यांनी भाजप हाच राज्याचा व देशाचा विकास करू शकतो हे गेल्या दहा वर्षांमध्ये दिसून आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारने देशाला गौरव प्राप्त करून दिलेला असून सर्व क्षेत्रांमध्ये होणारी प्रगती लोकापर्यंत कार्यकर्त्यांनी न्यावी आणि भाजपला मते देण्यासाठी लोकांना आग्रह करावा. असे सावईकर म्हणाले. सुत्र निवेदन सचिव सर्वानंद भगत यांनी केले.