प्रतिनिधी / सुमित तांबेकर
गोवा विधानसभेच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकिय पक्ष गोमंकियांना विकासाचे मुद्दे पुढे करत गोवावासियांनी का आपल्याला मतदान करावे हे सांगत आहेत. याच मुद्यावरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर राजकिय पक्षांना फटकारले. तसेच भाजप पुढील दहा वर्षाचा विकास अजेंडा गोमंतकियांसमोर ठेवणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. ते दैनिक तरुण भारत गोवा कार्यालयास भेट दिली यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. इतर पक्ष गोमतकियांना अनेक सवलती देऊ पाहतायेत याबद्दल भाजपची काय भुमिका असे विचारले असता भाजप येत्या एक ते दोन दिवसात पुढील दहा वर्षात गोमंतकियांसाठी काय काय विकासाची रुप रेषा असणार आहे. या बद्दल केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्याद्वारे आपण अजेंडा जाहीर करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच तृणमुल काँग्रेसने आज पर्यंत बंगालच्या जनतेला काही दिलेले नाही. तर ते आता गोमंतकियांना काय देणार असे ते म्हणाले.
तसेच आम आदमी सारखा पक्ष केवळ नागरिकांना आश्वासने देतो आहे. आणि ज्या दिल्लीचे ते सर्वांना उदाहरण देत विकासाचे गाजर दाखवतायेत त्या दिल्लीतच आता नागरिकांना विज , पाणी सारख्या मुलभुत घटकांनसाठी संषर्घ करावा लागत आहे. त्यामुळे ते ही गोमंतकियांना केवळ आश्वासने देऊ शकतात असे ते म्हणाले.
काही देश फक्त पर्यटनावर आपली अर्थव्यवस्था मजबुत करत आहेत
पर्यटनावर बोलताना फडणवीस म्हणाले कि, काही देश फक्त पर्यटनावर आपली अर्थव्यवस्था मजबुत करत आहेत. त्याप्रमाणे गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाकरीता अजुन संधी असुन, भाजप सत्तेवर आले तर त्यासाठी आमचे सरकार जरुर ठोस प्रकल्प हाती घेईल असे ही ते यावेळी म्हणाले. गेल्या काही वर्षात गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. ती अजुन ही वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.