बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीसारख्या महाभयंकर परिस्थितीत भाजप सरकार भ्रष्टाचारात अडकले आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्ये भ्रष्टाचाराची शर्यत लागली आहे. अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केली आहे. जगातील निरनिराळ्या देशांमध्ये, जेथे देशातील सरकारने लोकांना रोख रक्कम देऊन मदत पुरविली आहे, तेथे आपल्या देशामध्ये मदतीच्या नावावर १ टक्के व्याज दिले जाते. केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, परंतु या पॅकेजचा फायदा कोणाला झाला, यावर केंद्र सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. असे शिवकुमार यांनी म्हंटले आहे.
ऑटो आणि कॅब चालकांना पाच ते पाच हजार रुपये देण्याच्या घोषणेचा फायदा किती लोकांना झाला या प्रश्नाचे सरकारकडे उत्तर नाही. यावरून हे सिद्ध होते की राज्य सरकारच्या अशा घोषणा केवळ कागद्पत्रापुरत्या मर्यादीत आहेत. तसेच कॉंग्रेसचा संघर्ष केवळ सत्तेसाठी नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
जेव्हा समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होतो तेव्हा या अन्यायाविरूद्ध लढण्याची जबाबदारी कॉंग्रेसची आहे. जर एखाद्या समुदायाला लक्ष्य केले तर काँग्रेस त्याला कडाडून विरोध करेल, असे वक्तव्य शिवकुमार यांनी केले आहे.