अवघे 11 वर्षे वय असलेल्या मान्या हर्ष या दिल्लीतील मुलीने पर्यावरण संरक्षणासाठी आणि कचऱयाच्या समस्यतून मार्ग काढण्यासाठॅ फळे आणि भाजीच्या सालींपासून विविधोपयोगी कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळत असून तिने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. कांदा, लसूण, मटार, बटाटा, मका, नारळ, इत्यादींच्या साली आणि चिलखे यांच्यापासून इको प्रेंडली कागद ती तयार करते.
भारतात प्रत्येक घरात प्रति दिन 300 ग्रॅम वजनाचा भाज्यांचा कचरा निघतो. या कचऱयाचा योग्य उपयोग करून त्यापासून उपयुक्त वस्तू बनविल्यास कचऱयाची विल्हेवाट लावण्याची समस्या सुटू शकते. मान्या हर्ष या मुलीने हे तंत्रज्ञान शोधून देशाला कचरा व्यवस्थापनाचा एक नवा प्रभावी मार्ग दाखविला आहे. कागद तयार करताना प्रथम फळे आणि भाजीच्या साली एकत्र करून त्या पाण्यात उकळल्या जातात. उकळल्याने त्यांची पेस्ट बनते. त्यानंतर ही पेस्ट सपाट भागावर पसरली जाते. पेस्टमधून अतिरिक्त पाणी गळून गेल्यानंतर ती वाळवली जाते. त्यामध्ये काही रसायने घालून रंग दिला जातो. अशा प्रकारे या टाकाऊ कचऱयापासून उपयुक्त कागद तयार होतो. या कागदापासून शोभेच्या वस्तू पॅकिंगची साधनसामुग्री इत्यांदी तयारी केली जाऊ शकतात. या कागदाचेही रिसायकलींग होऊ शकते.