क्लोजडाऊनमुळे बाजारात दर घसरला : काजू पिकाचेही मोठे नुकसान
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे क्लोजडाऊनाचा नियम जारी करण्यात आला आहे. शासन कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनाचा परिणाम अनेक व्यवसायावर झालेला पहायला मिळत आहे. याला शेतीव्यवसाय देखील अपवाद नाही. तालुक्याच्या पश्चिम भागातील काजू उत्पादक व भाजीपाला उत्पादक शेतकऱयांना याचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्याने काही ठिकाणच्या शिवारात भाजीपाला पडून आहे.
प्रशासनाने एपीएमसीमधील भाजीमार्केट बंद करून शहराच्या तीन ठिकाणी भाजीमार्केटचे स्थलांतर केले आहे. स्थलांतरित तात्पुरत्या स्वरूपाच्या भाजीमार्केटची निर्मिती केली आहे. मात्र त्याठिकाणी शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
…अन् पिकांवर फिरवला नांगर
बाजार बंदचा फटका शेतकऱयांना बसला आहे. गतवर्षी तब्बल 4 महिन्यांहून अधिक काळासाठी बाजारपेठा लॉकडाऊनमुळे बंद होत्या. शिवाय शेतकऱयांचे भाजीपाला पीक बहरून आले होते. मात्र भाजीपाल्याची उचल न झाल्याने नांगर फिरवावा लागला. दरम्यान, बटाटा, टोमॅटो, वांगी, दोडकी, फ्लॉवर, कोबी, कारले, भेंडी आदी पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱयांना मोठय़ा आर्थिक तोटय़ाला सामोरे जावे लागले होते. यावषी देखील क्लोजडाऊनमुळे बाजारपेठांवर मर्यादा आल्याने भाजीपाल्यासह इतर पिके विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्चदेखील वाया गेला आहे. रब्बी हंगामातील हातातोंडाला आलेली पिके कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहेत. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजूर, मशागत यासाठी मोठा खर्च येतो. शिवाय बाजारपेठांकडे आणण्यासाठी वाहन खर्च, हमाली, दलाली याचा देखील भुर्दंड बसतो. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.