प्रतिनिधी / रत्नागिरी
भाटय़े समुद्रकिनारी बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास मुंबईहून आलेल्या पर्यटकांची गाडी ओहोटीच्या पाण्यासोबत वाळूमध्ये रुतल़ी स्थानिकांनी जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी पाण्याबाहेर काढल़ी त्यामुळे गाडी घेवून जाण्याचा अतिउत्साह पर्यटकांच्या अंगाशी आल़ा रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी मुंबईहून काही पर्यटक खासगी स्कॉर्पिओ वाहन (एमएच 03 एफ 2791) घेवून आले होते. दरम्यान भाटय़े येथील समुद्र बघून या पर्यटकांना समुद्रामध्ये उतरण्याचा मोह आवरता आला नाह़ी समुद्राजवळ पर्यटकांनी पायी न जाता गाडी थेट किनाऱयावर घातल़ी मात्र यावेळी ओहोटी सुरु झाली होती व या ओहोटीच्या पाण्याबरोबर पर्यटकांची गाडी वाळूमध्ये रुतू लागल़ी गाडी वाळूमध्ये रुतू लागल्याचे लक्षात येताच या अतिउत्साही पर्यटकांना घाम फुटल़ा याचवेळी सकाळी समुद्रकिनारी येणाऱया मॉर्निंग वॉकसाठी येणाऱया नागरिकांना पर्यटकांनी मदतीसाठी बोलावल़े त्यानंतर या नागरिकांनी जेसीबीला पाचारण केल़े त्यानंतर काही वेळात ही वाळूत रुतलेली स्कॉर्पिओ जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल़ी त्यामुळे या अतिउत्साही पर्यटकानी सुटकेचा निःश्वास टाकला तसेच मदत करणाऱया नागरिकांचे आभार मानल़े भाटय़े समुद्रकिनारी या आधीही अतिउत्साही पर्यटकांची वाहने बुडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत़