प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून जोरदार परतीचा पाऊस धुमाकूळ घातल असल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात कापलेली भात पिके पाण्याखाली सापडल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.
तालुक्मयात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा परतीच्या पावसाने हाहाकार माजविल्याने हातातोंडाला आलेली पिके धोक्मयात आली आहेत. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. तालुक्मयातील काही भागात बटाटा, रताळी, व भुईमूग काढणीची कामेही लांबणीवर पडली आहेत. तर माळरानावरील कापणी केलेली भात पिक पाण्यात सापडले आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाचे सावट शेतकऱयांसमोर आहे.
तालुक्मयातील भात पिक पावसाने आडवे झाले आहे. त्यामुळे भात पीक कुजण्याची चिंता शेतकऱयांना लागली आहे. त्यामुळे शेतकऱयांसमोर जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आधीच कोरोनाने हैराण झालेल्या शेतकऱयांसमोर पुन्हा एक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वरूणराजासमोर हतबल झाले आहेत.
सुगी हंगामाच्या तोंडावरच पावसाने धुमाकुळ घातल्याने बटाटा, भुईमूग, रताळी काढणीची कामे खोळंबली आहेत. खरीप हंगामातील भात पिकांसह बटाटा, रताळी व भुईमूग पिकांना फटका बसला आहे. त्याबरोबरच सतत पाऊस सुरू असल्याने बटाटा, रताळी व भुईमूग काढणी देखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे चिंतातूर बनला आहे.