प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या भात पिकांची मळणी सुरू आहे. मका पिकांच्याही मळण्या सुरू असून भात व मका पिकांना हमीभाव देऊन खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी एपीएमसी सदस्यांनी एपीएमसी अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतीसाठी येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसणे कठीण आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. भातावर व मक्मयावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. काही प्रमाणात जे उत्पादन निघाले आहे, त्याला योग्य भाव मिळाला तर काहीसा दिलासा शेतकऱयांना मिळणार आहे. शेतकऱयांची पिळवणूक सर्वच क्षेत्रांमध्ये सुरू आहे. तेव्हा तातडीने खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आर. के. पाटील, महेश जुवेकर, मनोज मत्तीकोप्प यांच्यासह सदस्य उपस्थित होते..