बेळगावः शहराचा विकास करताना रस्त्या शेजारी असलेली झाडे हटविण्यात आली आहेत. परिणामी शहराच्या तापमानात वाढ होण्याबरोबरच प्रदुषणही वाढले आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतनगर वडगाव परिसरात माजी नगरसेवक दिनेश रावळ व येथील युवक मंडळाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. स्मार्ट सिटी साकारताना तसेच रस्त्यांचा विकास करताना झाडांची कत्तल मोठय़ा प्रमाणात झाली आहे. त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणात बदल झाला आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनची गरज मोठय़ा प्रमाणात भासली. शहरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याकरिता झाडांची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून वडगाव-भारतनगर परिसरात वृक्षारोपण केले. माजी नगरसेवक दिनेश रावळ यांच्यासह रहिवाशांच्यावतीने डाळिंब तसेच विविध प्रकारची 22 रोपे लावली. याप्रसंगी दिनेश रावळ, रामा वाईंगडे, मनोज अभिषेक, साईप्रसाद, नवनाथसह तरूण मंडळी उपस्थित होती.
Previous Articleदुर्गम भागात रुग्णवाहिकेसह आरोग्य तपासणीची उत्तम सेवा
Next Article मुचंडी गावात स्टीमर मशीनचे (वाफ यंत्र) वितरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.