ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताने चीनच्या आणखी 47 अॅप्सवर बंदी घातली आहे. हे 47 अॅप्स यापूर्वी बंदी घातलेल्या 59 अॅप्सची क्लोनिंग करत होते. मोदी सरकारचा हा दुसरा डिजिटल स्ट्राईक असल्याचे सांगण्यात येते.
भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी तसेच यूजर्सना असुरक्षित असलेल्या 59 चिनी अॅप्सवर काही दिवसांपूर्वी भारत सरकारने बंदी घातली. त्यानंतर आज 47 अॅप्सवर बंदी घालण्यात आली. या अॅप्समध्ये काही गेमिंग अॅप्सही आहेत. हे 47 अॅप्स यापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या 59 अॅप्सचे क्लोनिंग करत होते. म्हणजेच टिकटॉक बंद झाल्यावरही ते टिकटॉक लाइट नावाने सुरूच होते.
भारत सरकारने आणखी 275 अॅप्सची यादी तयार केली आहे. ही अॅप्स वापरकर्त्यांसाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी किती योग्य आहेत, याची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर ही अॅप्स बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे.