ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटात विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी भारताने मालदीवला 25 कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारताने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी बॉन्ड विक्रीच्या रूपाने मालदीवला ही मदत केली आहे. त्याची मुदत 10 वर्षांची आहे. मालदीवचे पंतप्रधान इब्राहिम मोहंमद सोलिह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार ही मदत देण्यात आली आहे.
दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि मालदीव यांच्यात ऐतिहासिक संबंध असून, अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहण्याच्या भूमिकेतून भारताने मालदीवला मदत केली आहे. रविवारी परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मालदीवला आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद, अर्थमंत्री इब्राहिम आमीर, उच्चायुक्त संजय सुधीर आणि स्टेट बँकेचे पुरुष मुख्य कार्यकारी अधिकारी भरत मिश्रा उपस्थित होते.