एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचा अंदाज : कृषि क्षेत्राकडून आधार मिळण्याची आशा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर विपरीत परिणाम दीर्घकाळासाठी होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात (2020-21) भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्मयांनी आकुंचन पावणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केले आहे. दरम्यान, समाधानकारक पावसामुळे कृषि क्षेत्रामध्ये मात्र वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणीला थोडाफार चाप बसल्याचेही या कालावधीत दिसून आले आहे.
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था पाच टक्क्मयांनी घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर मर्यादा आल्याचे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे आशिया पॅसिफिकचे अर्थतज्ञ विश्रुत राणा यांनी सांगितले. मार्च ते जून 2020 या कालावधीत गेल्या वषीच्या याच काळाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तब्बल 23.9 टक्क्मयांनी घसरली. कोरोनाची जागतिक महामारी, तिला आळा घालण्यासाठी केलेला लॉकडाऊन यामुळे खासगी क्षेत्रातील एकूण खरेदीक्षमता तब्बल 26.7 टक्क्मयांनी घटली, तर स्थिर गुंतवणूक 47.1 टक्क्मयांनी घसरली.
जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी महामारीची साथ सुरूच राहणार असल्यामुळे आर्थिक वाढीला आळा बसणार असल्याचा आमचा अंदाज आहे, असे राणा म्हणाले. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात दरदिवशी सरासरी 90 हजारच्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. जोपर्यंत कोरोनाचा धोका कायम राहील तोपर्यंत ग्राहक खर्च करताना तसेच कंपन्या गुंतवणूक करताना हात आखडता घेतील असे राणा यांनी सांगितले.
औद्योगिक व्यवहार सुरळित होत असले तरी उत्पादन गेल्या वषीच्या तुलनेत कमीच राहणार असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीतही गेल्या वषीच्या तुलनेत जीडीपीची वाढ निगेटिव्ह राहणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने वर्तवला आहे.