ऑनलाईन टीम / राजकोट
भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे पहिला सामना एकही गडी बाद न होता जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला राजकोटच्या सामन्यात ऑल आऊट होण्याची नामुष्की पत्करावी लागली. भारताच्या 341 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 304 धावांवरच गुंडाळला. त्यामुळे भारताचा 36 धावांनी विजय झाला. या विजयामुळे भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.