ऑनलाईन टीम /
भारताने मालदीवसोबत 5 कोटी डॉलर्सचा संरक्षण कर्ज करार केला आहे. ज्यामुळे द्वीप राष्ट्रांच्या शिपिंग क्षेत्रातील क्षमता उभारणीच्या सुविधांना चालना मिळेल. तसेच भारत नेहमीच मालदीवचा विश्वसनीय सुरक्षा भागीदार असेल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी सांगितले.
दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यात जयशंकर यांनी मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दीदी यांची भेट घेतली. मारिया दीदी आणि जयशंकर यांच्यात सौहार्दपूर्ण बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दल चर्चा झाली. मारिया दीदी यांच्यासोबत यूटीएफ बंदर प्रकल्प करारावर स्वाक्षरी करता आली. यामुळे मालदीवची तटरक्षक दलाची क्षमता वाढेल आणि प्रादेशिक एचडीआर प्रकल्पाला मदत होईल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.