नवी दिल्लाr : आशियाई विकास बँकेने 2020 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 4 टक्के इतकी आक्रसणार असल्याचे गुरुवारी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर कायम राहणार असून मागणीही कमकुवत होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. आशियाई विकासाच्या गटात 40 देश येतात. हाँगकाँग, चीन, प्रजासत्ताक कोरिया, सिंगापूर, तैपाई या देशांचा विकास यावषी 0.4 टक्के आणि 2021 मध्ये 6.6 टक्के वाढणार असल्याचा अंदाज बँकेने वर्तवला आहे. 31 मार्च 2021 पर्यंतच्या 2020 आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 4 टक्क्मयांनी घसरणार असली तरी पुढील आर्थिक वर्षात मात्र ती 5 टक्के मजबूत वाढ दर्शवणार आहे.
फिचचाही घसरणीचा अंदाज
दुसरीकडे रेटींग एजन्सी फिचनेही भारतीय अर्थव्यवस्था मार्च 2021 पर्यंत 5 टक्क्मयांनी आक्रसली जाणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम व्यवस्थेवर दिसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.