विदेश मंत्री जयशंकर ब्रिटन दौऱयावर- निवडणूक अटळ, रोखू शकत नाही
वृत्तसंस्था / लंडन
भारताची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे कोलमडून गेल्याची कबुली विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी जगासमोर दिली आहे. जी-7 च्या विदेश आणि विकास मंत्र्यांच्या बैठकीत अतिथी मंत्री म्हणून भाग घेण्यासाठी जयशंकर ब्रिटन येथे पोहोचले आहेत. निवडणूक प्रचारसभांना कोरोना संक्रमणासाठी जबाबदार ठरविणाऱया प्रश्नावर जयशंकर यांनी निवडणूक अटळ असल्याचे सांगितले आहे. आम्ही अत्यंत लोकशाहीवादी आणि राजकीय देश आहोत आणि लोकशाहीत निवडणूक न घेणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
ब्रिटन येथील इंडिया इंक ग्रुप ही माध्यम संस्था आणि लंडनमधील भारतीय दूतावासाकडून आयोजित जागतिक संवादाच्या एका कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आहे. कोविड-19 ची दुसरी लाट अत्यंत मोठे आव्हान आहे. जगभरातील देशांकडून भारताला मदत मिळत आहे. भारताला या संकटाच्या क्षणी पूर्ण जग आमच्यासाब्sात असल्याची जाणीव असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारताची आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम वाढविणे आणि जागतिक महामारीच्या संकटासह देशाच्या गरजा समजून घेण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडू. पण यातून एक मोठा धडा मिळाला आहे, एकजुटतेची भावना आहे. आम्ही सध्या ज्या स्थितीतून जात आहोत, त्याला जवळपास सर्वच देशांनी तोंड दिले असल्याचे जयशंकर म्हणाले.
विदेशांमधून मदतीसाठी आभार
ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देश तसेच इतरांकडून अत्यंत आवश्यक वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठय़ाच्या दृष्टीने मदत करण्यात आली आहे. ही जागतिक महामारी महत्त्वपूर्ण बदलांसह विचारांमध्येही बदल घडवून आणणारी आहे. सध्या मी कूटनीतित एकजूटता पाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोष देण्याची वेळ नव्हे
कोरोना संकटासंबंधी वारंवार सूचना देण्यात येत होत्या, सार्वजनिक आरोग्याच्या पथकांना पाठविले जात होते. ऑक्सिजन उत्पादन वाढविण्यासाठी पावले उचलण्यात आली, पण दुर्दैवाने रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यावर लोकांमध्ये महामारी संपल्याची भावना निर्माण झाली. निश्चितपणे कुणाला दोष देण्याची ही वेळ नाही, पण आम्ही सुरक्षेत चूक केल्याचे देशात कुणी म्हणेल असे मानत नसल्याचे विदेशमंत्री म्हणाले.
आरोग्यावर खूपच कमी गुंतवणूक देशातील आरोग्य व्यवस्थेचे स्वरुप समोर आले आहे. 75 वर्षांपासून आम्ही आरोग्याच्या क्षेत्रात खूपच कमी गुंतवणूक केली आहे. याच जाणीवेतून पंतप्रधान आयुष्मान भारतावर भर देत होते. आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे. पण संकटकाळात लोकांना धोरणात्मक स्पष्टीकरण नको असते. त्यांना प्रत्यक्ष व्यवहारिक तोडगे हवे असतात. देशाला पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.