वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुस्लीम ब्रदरहुड नावाच्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेने भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बहिष्कार मोहीम चालविली होती. या मोहिमेचा उद्देश देशाच्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांना बदनाम करणे हा होता. देशांतर्गत घटकांशी संगनमत करत सुरू करण्यात आलेल्या या भारतविरोधी मोहिमेने देशाच्या अहिंसक प्रतिमेला ‘कट्टरवादी’च्या स्वरुपात बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मुस्लीम ब्रदरहुडने या मोहिमेत बहिष्कार, निर्गुंतवणूक यासारख्या युक्त्या वापरण्यात आल्या, यातून देशात वाद उभा करण्याचा प्रयत्न होता. मागील काही वर्षांमध्ये भारतविरोधी काही कथा तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टी अब्जावधी डॉलर्सच्या कॉन्फ्लिक्ट इंडस्ट्रीचा हिस्सा झाल्या. या मोहिमेला तुर्कस्तान आणि पाकिस्तानचे समर्थन प्राप्त होते. मुस्लीम ब्रदरहुडची ही मोहीम कतार-तुर्कस्तान-पाकिस्तानच्या नव्या उभरत्या आघाडीद्वारे सुरू झाली होती. याचे लक्ष्य काश्मीरच्या नॅरेटिव्हमधून भारताला लक्ष्य करणे होते असे प्रसारमाध्यमांच्या अहवालात म्हटले गेले आहे.
कॉन्फ्लिक्ट इंडस्ट्रीत विविध सरकारे आणि समुदाय सामील असतात. यात सामील प्रमुख चेहरे आणि संघटनांचे सर्वसाधारणपणे संघर्षाशी कुठलेच देणेघेणे नसते, त्यांच्याकडे प्रत्यक्ष अनुभव नसतो, तरीही ते सर्वाधिक गोंगाट करणारे असतात.
काश्मीरचा मुद्दा कॉन्फ्लिक्ट इंडस्ट्रीसाठी नवा नाही. मागील काही अहवालांमधून कशाप्रकारे ‘कार्यकर्ते’, ‘कथित स्वयंसेवी संस्था’ आणि अन्य संघटनांकडून काश्मीरच्या नावावर मोठी देणगी मिळविली जात असल्याचे समोर आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.