नवी दिल्ली/प्रतिनिधी
भारताच्या मंगळयान मोहिमेला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ५ नोव्हेंबर २०१३ ला मंगळयान हे इस्त्रोने प्रक्षेपित केले होते, जवळपास १० महिन्यांचा प्रवास पुर्ण करत आजच्या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास २०१४ ला मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. इस्त्रोने खरं तर या मोहीमेचे फक्त सहा महिन्यांसाठी नियोजन केले होते. मात्र सहा महिन्यांनंतर मंगळयानमधील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याने आणि यानामध्ये इंधन बाकी असल्याने मोहिमेचा कालावधी वाढवला होता. त्यानंतर वेळोवेळी आढावा घेत मंगळयान मोहिमेला extension देण्यात आले.
भारताच्या मंगळयान मोहिमेला आज ७ वर्षे पूर्ण झाली. आजही मंगळयान सुस्थितीत असल्याने आणि यानामध्ये काही इंधन बाकी आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे मंगळयान हे मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करू शकणार आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाचा अभ्यास यापुढेही सुरु रहाणार आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाभोवती पोहचणारा जगातील पहिला देश म्हणून भारताच्या मंगळयान मोहिमेचे याआधीच जगभरात भरपूर कौतुक झाले आहे.