ऑनलाईन टीम / केनबर्रा :
भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी अविश्वासार्ह आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेवर नव्या समस्या निर्माण होत असल्याचे वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी म्हटले आहे.
मार्क मॅकगोवन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, देशात मागील 24 तासात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, आज चार नवे कोरोना रुग्ण आढळले असून, ते सर्वजण भारतातून परतले आहेत. त्यांना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच विमान प्रवास करता येत आहे. भारतात कोरोना निगेटिव्ह असलेले प्रवाशी ऑस्ट्रेलियात पॉझिटिव्ह आढळत आहेत. आज सकाळीच एक विमान ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहे. या विमानातून आलेल्या 78 जणांपैकी अनेक जण कारोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. कारण भारतीय कोरोना चाचण्या अचूक नाहीत, अथवा आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे मॅकगोवन यांनी स्थानिक मीडियाला सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारने भारतीय विमानसेवा 15 मे पर्यंत स्थगित ठेवली आहे.