ऑनलाईन टीम / तरुण भारत
भारतातील रस्ते अनेक कारणांनी जगभरात चर्चचेत आले आहेत. कारण रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्या खड्ड्यांतून होणारे अपघात आणि अपघातांमुळे वाढत असलेलं मृत्यूंचं प्रमाण या साऱ्या चर्चा नेहमीच होत आहेत. मात्र यावर शाश्वत उपाय निघालेला नाही. याबाबत मात्र या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली असुन त्यानुसार भारतातील रस्त्यांचं जाळं २०२४ पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचं करणार असल्याचं. काँग्रेस खासदार एल. हनुमंथैय्या यांच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामध्ये ही माहिती दिली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील दोन वर्षे अर्थात २०२४ पर्यंतचा प्लान ऑफ अॅक्शनच जाहीर केला आहे. यावेळी गडकरींनी भारतातील रस्त्यांचं जाळं आणि त्या अनुषंगाने लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा यांच्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. “भारतामधील रस्त्यांचं जाळं आणि संबंधित पायाभूत सुविधा २०२४ पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचं नियोजन केंद्र सरकारने केलं आहे”, असं गडकरी म्हणाले. तसेच, रस्ते सुरक्षेसंदर्भात लोकांमध्ये अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे, असं देखील त्यांनी नमूद केलं.
तसेच गडकरी यांनी यावेळी भारतात रस्त्यांचं मोठं जाळं उभारणं ही सध्या समस्या नसल्याचं नमूद केलं. “भारतात रस्त्यांचं जाळं उभारणं हीच एकमेव समस्या नाही. रस्ते उभारणी तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण हे देखील मुद्दे यामध्ये महत्त्वाचे ठरतात असं ते म्हणाले. मंत्री गडकरी हे दिलेल्या शब्द पुर्ण करणारे म्हणुन त्यांची ख्याती आहे. तसेच भारतात वेगाने होत असलेल्या रस्त्यांचा विकास याचं बहुतांशी श्रेय मंत्री गडकरी यांनाच जाते. कारण देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे मंत्री गडकरी यांच्या कारकिर्दीत पुर्ण झाले आहेत.