ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अद्यापही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारवर ट्विट करत जोरदार टीका केली.
टीका करताना प्रियांका गांधी यांनी भारत आता लोकशाही देश राहिला आहे का? अशी विचारणा केली आहे.
प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे की, कोणत्याही गुह्यांची नोंद नसताना जम्मू आणि काश्मीर राज्याच्या दोन मादी मुख्यमंत्र्यांना बंदिस्त करण्यात आले आहे. लाखो लोक तिथं अडकली आहेत. हे सगळं किती दिवस चालणार हे आम्ही सहा महिन्यापूर्वीच विचारत होतो ? आता आम्ही आपण अद्याप देशात लोकशाही आहे की नाही अशी विचारणा करत आहोत.