ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोनाबळींची संख्या 1 लाखावर पोहचली असून, जगभरातील कोरोनाबळींच्या संख्येत भारताचा 10 टक्के वाटा आहे. देशात आतापर्यंत 64 लाख 73 हजार 545 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 842 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात मागील 24 तासात 79 हजार 476 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 9 लाख 44 हजार 996 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 54 लाख 27 हजार 707 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 7 कोटी 78 लाख 50 हजार 403 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 32 हजार 675 रुग्णांची तपासणी शुक्रवारी एका दिवसात करण्यात आली.