ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 26 लाख 47 हजार 664 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 50 हजार 921 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
मागील 24 तासात 57 हजार 982 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 941 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 6 लाख 76 हजार 900 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 19 लाख 19 हजार 843 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात 3 कोटी कोरोना चाचण्या
देशात आतापर्यंत 3 कोटी 41 हजार 400 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 31 हजार 697 रुग्णांची तपासणी रविवारी एका दिवसात करण्यात आली.