ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाधितांनी दोन लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील 24 तासात 8909 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 07 हजार 615 वर पोहचली असून, मृतांची संख्या 5815 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 01 हजार 497 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 303 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 72 हजार 300 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 24 हजार 586, गुजरातमध्ये 17 हजार 617, मध्यप्रदेश 8420, आंध्र प्रदेश 3898, बिहार 4155, राजस्थान 9373 तर पश्चिम बंगालमध्ये 6168 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.