ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोना रुग्णांची संख्या साडेपाच लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. देशात मागील 24 तासात 19 हजार 459 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5 लाख 48 हजार 318 वर पोहचली असून, मृतांची संख्या 16 हजार 475 एवढी आहे.
सध्या देशात 2 लाख 10 हजार 120 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 21 हजार 723 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 64 हजार 626 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 83 हजार 077, तामिळनाडूत 82 हजार 275, गुजरातमध्ये 31 हजार 320, मध्यप्रदेश 13 हजार 186, आंध्र प्रदेश 13 हजार 241, बिहार 9212, राजस्थान 17 हजार 271, उत्तरप्रदेश 22 हजार 147 तर पश्चिम बंगालमध्ये 17 हजार 283 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.