ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोना लसीचे 45 लाख डोस वाया गेल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. कोरोना लसीचा अपव्यय झालेल्या राज्यांमध्ये पाच राज्य आघाडीवर आहेत.
भारतात 11 एप्रिलपर्यंत लसीकरण करण्यात आलेल्या 10.34 कोटी लसींपैकी 44.78 लाख लसीचे डोस वाया गेले आहेत. लस वाया जाणाऱ्या राज्यात तामिळनाडू राज्य आघाडीवर आहे. तेथे 12.10 टक्के लस वाया गेली आहे. हरियाणात 9.74 टक्के, पंजाबमध्ये 8.14, मणिपूर 7.80 तर तेलंगणामध्ये 7.55 टक्के लसीचे डोस वाया गेले आहेत.
तर देशातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लसीचा अपव्यय झाला नाही. त्यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दीव दमण, अंदमान, निकोबार बेट, लक्षद्विप यांचा समावेश आहे.