कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारत वेगाने पावले उचलत आहे. सरकारने कोरोना विरोधी लढय़ासाठी कोविड-19 क्लीनिकल रिसर्च नेटवर्क निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामारीसंबंधीच्या अध्ययनाला चालना मिळणार आहे. भारताच्या या निर्णयाला महामारी रोखण्यासाठी औषधे विकसित करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊ मानले जात आहे.
कोरोना महामारी रोखण्यासंबंधी होणाऱया प्रयत्नांचा आढावा घेणाऱया राष्ट्रीय कृतिदलाच्या तज्ञसदस्याने याची शिफारस केली आहे. रिसर्च कोलेबोरेटिव्ह नेटवर्क भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने काम करणार आहे.
स्पेसिफिक क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल विकसित करणे हा या नेटवर्कमागील उद्देश आहे. याकरता एक केंद्रीयकृत डाटाबेस तयार करावा लागणार असून तो क्लीनिकल आणि लॅबोरेटरी मापदंडांवर आधारित असेल असे आयसीएमआरने म्हटले आहे. सद्यकाळात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया रुग्णालयांना या नेटवर्कचा भागीदार होण्यास सांगण्यात आले आहे.
लक्षणांच्या आधारावर कोरोना रुग्णावर उपचार करणाऱया सर्वांना यात सामील करण्यात आले आहे. कोरोनाच्या 80 टक्के रुग्णांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत. तर 15 टक्के गंभीर लक्षणे आढळणाऱया रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रास दिसून येतो. तर 5 टक्के रुगांना व्हेंटिलेटरचे सहाय्य घ्यावे लागते.
कोरोनासंबंधी बरीच माहिती हाती लागली असून यापुढेही बरेच काही जाणून घ्यावे लागणार आहे. संशोधनातून अनेक बाबी समोर येत राहतील. नवी माहिती मिळाल्यावर या महामारीचे पॅटर्न समजता येईल आणि यातून उपचार करणे सोपे होणार असल्याचे आयसीएमआरच्या संशोधकाने म्हटले आहे.