ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील आठ वर्षात ७५० वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्यात सर्वाधिक १७३ मृत्यू मध्यप्रदेशमध्ये झाले आहेत. तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने ही माहिती दिली.
देशात एकूण ३९६ वाघांचे मृत्यू हे नैसर्गिक झाले आहेत. १६८ वाघांची शिकार झळज असून, ७० वाघांच्या मृत्यूबाबत चौकशी चालू आहे.अपघात किंवा आपापसातील संघर्षामुळे ४२ वाघांचा मृत्यू झाला आहे.
वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात ८ वर्षात १२५ वाघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात ही संख्या १११, उत्तराखंड ८८, तामिळनाडू आणि आसाममध्ये प्रत्येकी ५४ आहे. केरळ आणि उत्तर प्रदेशात ३५, राजस्थानात १७, बिहारमध्ये ११ तर पश्चिम बंगालमध्ये १० वाघांच्या मृत्यूची नोंद आहे.