ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या भारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिश्कील शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अच्युत पालवांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अच्युत पालव यांचं लेखन अतिशय सोपं वाटतं. मात्र ते काम सुरू केल्यावर त्यातल्या अडचणी समजतात. अच्युत पालवांच्या कामाला तोड नाही. अच्युत पालवांच्या काम काय असतं, पुस्तक काय असतं, अक्षर काय असतं हे या पूस्तकातून तुमच्या लक्षात येईल. त्यांच काम मी सुरुवातीपासून पाहतोय.
मोडी लिपीवर बोलताना त्यांनी मोजक्या शब्दांत राजकीय भाष्य केलं. सध्या फार कुठे मोडी लिपी पाहायला मिळत नाही. देशात तर केवळ मोदी लिपीच पाहायला मिळते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.