देशभरात आतापर्यंत ३.२९ कोटी लसींचे दिले डोस
सोमवारी एकाच दिवशी ३० लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली
नवी दिल्ली/प्रतिनिधी
भारताने कोविड -१९ विरोधातल्या एकत्रित लढाईत अनेक उच्चांक नोंदवले आहेत. देशात सुरु असणाऱ्या लसीकरणाने ३.२९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना सरकार सर्वतोपरी करत आहे. दरम्यान सोमवारी देशात एका दिवसात सर्वाधिक तीस लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली. केवळ १५ दिवसात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १ कोटीहून अधिक लाभार्थीना लस देण्यात आली आहे.
आज सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या अंतरिम माहितीनुसार आतापर्यंत ५,५५,९८४ सत्रांद्वारे ३,२९,४७,४३२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ७४,४६,९८३ एचसीडब्ल्यू (पहिला डोस), ४४,५८,६१६ एचसीडब्ल्यू (दुसरा डोस), ७४,७४,४०६ एफएलडब्ल्यू (पहिला डोस) आणि १४,०९,३३२ एफएलडब्ल्यू (दुसरा डोस) यांचा समावेश आहे. विशिष्ट अन्य आजार असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १८,८८,७२७ लाभार्थीना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १,०२,६९,३६८ लाभार्थीना लस देण्यात आली आहे.
लसीकरण मोहिमेच्या १५ मार्च २०२१ म्हणजेच ५९ व्या दिवसापर्यंत, एकूण ३०,३९,३९४ लस मात्रा देण्यात आल्या आहेत . त्यापैकी २६,२७,०९९ लाभार्थीना ४२,९१९ सत्रांमध्ये पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला आणि त्यांनतर ४,१२,२९५ एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यूंना लसीचा दुसरा डोस मिळाला.
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत या राज्यांमधून ७९.७३ टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत २४,४९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात १५,०५१ इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये १८,१८ तर केरळमध्ये १०५४, कर्नाटकमध्ये ९३२ नवीन रुग्ण आढळले आहेत.