प्रतिनिधी / बार्शी
प्राचीन परंपरा आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट्स नसलेल्या भारतीय आयुर्वेद शास्त्राला जगाच्या पाठीवर खूप महत्त्व आणि मागणी आहे असे मत बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त श्री विश्व भैरव आयुर्वेदिक केंद्र आणि आण्णा पेठकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, आयुर्वेदिक तज्ञ डॉ प्रदीप जाधव, पाणी पुरवठा सभापती भैय्या बारंगुळे, आण्णा पेठकर, बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष शहाजी फुरडे पाटील, संपादक संघाचे अध्यक्ष योगेश लोखंडे, माजी अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, पत्रकार संजय बारबोले, गणेश गोडसे, नितीन भोसले, विवेक गजशिव, संदीप मठपती, संगीता पवार, सुवर्णा शिवपुरे, गणेश घोलप, गोविंद भिसे, सुहास कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रदीप जाधव यांच्या वतीने करोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी मोफतआयुष काढा देण्यात आला।
डॉ जाधव म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी मानवी साखळी तोडणे अंत्यत गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेला “आयुष काढा ” हे प्रभावी काढा आहे. करोना विरुद्धच्या लढाईमध्ये आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांना विशेष जोखमीची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्यामुळे आम्ही या सर्व घटकांना मोफत काढा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन संदीप आलाट यांनी केले तर आभार शहाजी फुरडे पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आण्णा पेठकर, किरण नान्नजकर,काकडे ,विजय शिंगाडे,जमीर शेख,बालाजी डोईफोडे, सुहास कांबळे, आदींनी परिश्रम घेतले.