वृत्तसंस्था/ कोलकाता
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी झालेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आले. डोहा येथे झालेल्या विश्व एकेरी पात्रता टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या चारही स्पर्धकांना पराभव पत्करावा लागला.
या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या चार पुरूष आणि पाच महिला टेबल टेनिसपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता. दरम्यान पुरूष विभागात भारताच्या अचंता शरथ कमल आणि जी. साथियान यांचे आव्हान रविवारी समाप्त झाले तर महिलांच्या विभागात भारताच्या मनिका बात्रा आणि एस. मुखर्जी यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. आता भारतीय टेबल टेनिसपटू 18 मार्चपासून सुरू होणाऱया आशियाई पात्रता स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत टोकियो ऑलिंपिकचे तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करतील.