ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील वातावरण ठीक नाही. मात्र, या तणावादरम्यान रशियाने भारतीय माध्यमांवर नाराजी आपली व्यक्त केली आहे. यामुळे, रशियाच्या युक्रेनसोबतच्या तणावाबाबत भारतीय माध्यमांनी वार्तांकन केल्याने मॉस्को नाराज आहे. तसेच भारतीय माध्यमांनी कझाकस्तान आणि युक्रेनबाबत अर्ध सत्य सांगितले आहे, असे त्यांचे मत आहे.
रशियन दूतावासाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून, ट्विट करत याबद्दल भाष्य केले आहे. “आम्ही खेद व्यक्त करत आहोत की काही भारतीय माध्यमांमधून पुन्हा एकदा युक्रेनच्या अंतर्गत संकटातील परिस्थितीचे चुकीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या प्रकरणी रशियाची भूमिका उलट असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याउलट, युक्रेनियन अधिकार्यांनी केलेल्या अपमानजनक विधानांच्या प्रसारासह आम्ही समजतो की या एकतर्फी अहवालांचा भारत सरकारच्या अधिकृत वक्तव्यांशी काहीही संबंध नाही. आम्हाला काही मुद्द्यांवर आमची भूमिका स्पष्ट करायची आहे,” असे रशियन दूतावासाने म्हटले आहे.