ऑनलाईन टीम / तरुण भारत
भारतीय वायुसेनेकडूऩ दैनंदीन तपासणी सुरु असताना 9 मार्च रोजी पाकिस्तानात सामरिक ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. हे क्षेपनास्त्र शेजारील देश म्हणजेच पाकिस्तानमध्ये कोसळले होते. याची दखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबद्दल भाष्य करत आपण संय्यम ठेवत कोणता ही प्रतिकार करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
तर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत 15 मार्च रोजी स्पष्टीकरण देताना सांगितले कि, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, “९ मार्च रोजी दुर्दैवाने क्षेपणास्त्र डागण्यात आले. ही घटना नियमित तपासणीदरम्यान घडल्याचं सांगितलं.तसंच भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित असुन सशस्त्र दल अशा यंत्रणा हाताळण्यात अनुभवी आहेत. याचबरोबर शस्त्रास्त्र प्रणालींच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही हलगर्जी आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाईचे ही आश्वासन त्यांनी दिले आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा कमांड एअर स्टाफ इन्स्पेक्शनच्या होम बेसवर अपघाती गोळीबार झाला तेव्हा संबंधित अधिकारी क्षेपणास्त्र प्रणालीच्या मोबाईल कमांड पोस्टचा प्रभारी होता. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम तपशील कळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.