वृत्तसंस्था/ रायपूर
हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने भारतीय संघाला 60 टक्के मानधन कपातीचा दंड करण्यात आला आहे.
सामनाधिकारी जावगल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली असून भारताने निर्धारित वेळेत तीन षटके कमी टाकल्याचे त्यांनी सांगितले. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार एका षटकासाठी 20 टक्के मानधनकपातीचा दंड करण्यात येतो. कर्णधार रोहित शर्माने अपराध व कारवाई मान्य केली असल्याने औपचारिक सुनावणी घेण्यात आली नाही. मैदानी पंच, तिसरे व चौथे पंच यांनी या संदर्भात अहवाल दिला होता.