ऑनलाईन टीम / लेह :
पूर्व लडाखमधील सीमावादामुळे भारत-चीनमधील तणाव कायम असतानाच चीनी लोकांनी आता डेमचोक भागात चार्डींग नाल्याच्या बाजूला भारतीय हद्दीत तंबू उभारले आहेत.
चार्डींग नाल्याच्या बाजूला तंबूत राहणारे हे लोक तथाकथित नागरिक आहेत. त्यांना भारतीय सैन्याने परत जाण्यास सांगितले आहे. मात्र, ते नागरिक अद्याप परतले नसल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही देशातील लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेच्या 12 व्या फेरीसाठी सोमवारी चीनने प्रस्ताव दिला होता. मात्र, भारतात आज कारगिल दिवस साजरा करण्यात येणार असल्याने ही बैठक ऑगस्टमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येते.