21 ऑक्टोबर रोजी होणार बंद ः21 हजार कोटी उभारण्याची तयारी
वृत्तसंस्था/ मुंबई
जे दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे शेअरहोल्डर आहेत, तर त्यांच्यासाठी कंपनीचे समभाग सवलतीमध्ये खरेदी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचा राइट्स इश्यू खुला झाला असून तो 21 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. कंपनी सदर इश्यूच्या मदतीने 21,000 कोटी रुपये उभारण्याची रितसर योजना आखत आहे. हा फंड 230 रुपयाच्या प्रीमियमसह 535 रुपये प्रति समभाग भावावर जमा करण्यात येणार आहे.
सवलतीमध्ये उपलब्ध होणार समभाग
सध्या भारती एअरटेलचे समभाग 695 रुपयावर बाजारात ट्रेड (व्यवहार)करत आहेत. यासोबतच राइट्स इश्यूमध्ये कंपनीच्या समभागहोल्डरला 535 रुपयाचे समभाग विक्री करता येणार आहेत. याच्यासाठी प्रति समभाग गुंतवणूकदारांना योग्य ती सवलत मिळणार आहे. भारती एअरटेलच्या संचालक मंडळाने 29 ऑगस्ट रोजी राइट्स इश्यूच्या आधारे 21,000 कोटी रुपयांचा फंड जमा करण्यास मंजुरी दिली होती.
किती समभाग खरेदी करता येणार
समभाग निश्चित प्रमाणात राइट्स इश्यूमध्ये खरेदी करता येणार आहेत. कंपनीने यासाठी 1ः14 चा टप्पा निश्चित केला आहे. याचाच अर्थ समभागधारकांना सध्या एअरटेलच्या प्रत्येक 14 समभागांसोबत एक समभाग अतिरीक्त खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.