ऑनलाईन टीम/ तरुण भारत
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचे सरकार भारताला ५० हजार मेट्रिक टन गहू शेजारच्या अफगाणिस्तानला त्यांच्या हद्दीतून पाठवण्याची परवानगी देईल अशी घोषणा त्यांनी सोमवारी केली. इस्लामाबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अफगाणिस्तान आंतर-मंत्रालय समन्वय कक्षाच्या पहिल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद खान यांनी भूषवले.
या बैठकीत इम्रान खान यांनी मानवतावादी संकट टाळण्यासाठी अफगाणिस्तानला पाठिंबा देण्याच्या सामूहिक जबाबदारीची आंतरराष्ट्रीय समुदायाला आठवणही त्यांनी करून दिली. बैठकीदरम्यान, खान यांनी पाकिस्तानच्या निर्णयाची घोषणा केली की भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी सहाय्य म्हणून ५०,००० मेट्रिक टन गहू देण्याची ऑफर दिली आहे, जी भारताच्या बाजूने कार्यपद्धती निश्चित होताच पाकिस्तानमधून जाईल, असे वृत्त पाकिस्तानी सरकारी रेडिओने दिले.