ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर सिक्कीममधील नाकूला सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कर आणि चिनी पीएलएमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सीमेवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नाकूला सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर आज चिनी सैनिकांनी उद्दामपणा दाखवल्याने दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत भारताचे 4 तर चीनचे 7 जवान जखमी झाले आहेत. काही काळ सुरू असलेला वाद स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर निवळला. त्यानंतर भारतीय लष्कर आणि चिनी पीएलए सैनिक आपापल्या पोस्टवर गेल्याचे सांगण्यात येते.