ऑनलाईन टीम / लडाख :
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील एक कर्नल आणि दोन जवान शहीद झाले. विशेष म्हणजे 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये अशी चकमक झाली आहे. भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून चीनी सैन्यांकडून भारतीय हद्दीत अतिक्रमण सुरू होते. त्यामुळे पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर दोन्ही देशात तणाव वाढला होता. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत कर्नलसह तीन जवान शहीद झाले. दोन्ही देशातील तणाव वाढू नये म्हणून, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून आपापसात चर्चा सुरू आहे.